Cooking Oil Prices : दिलासादायक! खाद्य तेलाच्या किमती होणार तब्बल 500 रुपयाने कमी? सरकारनं उचललं मोठं पाऊल….!

Cooking Oil Prices : दिलासादायक! खाद्य तेलाच्या किमती होणार तब्बल 500 रुपयाने कमी? सरकारनं उचललं मोठं पाऊल….!

 

Cooking Oil Prices : सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती (Oil Prices) कमी होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळं देशात तेलाच्या किंमती होण्याची शक्यता आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं (Solvent Extractors Association of India) याबाबतची माहिती दिली आहे.

 

 

खाद्यतेलाच्या किमती कमी

पाहा तेलाचे भाव

 

खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणं सध्या शक्य होईल का?
सरकारनं जरी तेल कंपन्यांना खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले असले तरी, प्रत्यक्षात दर कमी होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत खाद्यतेल क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे. खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणे सध्यातरी शक्य होणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मार्चपर्यंत देशात मोहरी काढणीला सुरुवात होईल, तेव्हा खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मोहरी काढणीनंतर खाद्यतेलाचा नवीन पुरवठा होईल, त्यानंतर खाद्यतेल किंवा स्वयंपाकाच्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:  ssc result board exam : 10वी चा निकाल जाहीर या वेबसाईटवर पहा 0 मिनिटात

 

Sbi ची खातेधारकांना अनोखी भेट,मिळणार 4 लाख रुपये,

फक्त दोन दिवसात खात्यात जमा….!

 

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार किंमती कमी करण्यास सांगितले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाचे दर जागतिक किमतीच्या सापेक्ष कमी केले पाहिजेत, जे काही काळापासून होत नव्हते, त्यामुळं आता त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, असे मत सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे.

 

“या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा…

 

महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न Cooking Oil Prices
केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी विविध मार्ग अवलंबत आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावले उचलत आहे. डिसेंबरमध्येच सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.Cooking Oil Prices

हे पण वाचा:  Crop Insurance maharashtra Lists :पीक विमाचे हेक्टरी 35,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा

 

पाइपलाइनमध्ये खूप कमी तेल आहे
ते म्हणाले की, देशातील खाद्यतेलाच्या पाइपलाइनमध्ये अत्यल्प तेल आहे. अशा काळात नवरात्र आणि लग्नसराईची मागणी वाढणार आहे. पाइपलाइनमध्ये पुरेसे तेल असल्याचा दावा करणाऱ्यांनी जबाबदारीने विचार करावा लागेल की खाद्यतेल गेले कुठे? सूर्यफुलाच्या तुलनेत पाम आणि पामोलिनच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याशिवाय खाद्यतेलाच्या पुरवठ्यात सुधारणा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील मोहरी, भुईमूग, देशी सूर्यफूल, कापूस आणि सोयाबीनपासून मिळणारा पाम आणि पामोलिनचा तुटवडा पूर्ण करणे कठीण आहे. कारण जास्त किंमत आणि किमान आधारभूत किंमत (MSP) यामुळे या देशी तेलांच्या किमती खूप जास्त आहेत.Cooking Oil Prices

हे पण वाचा:  चष्म्याचा नंबर घालवा ? हे उपाय आजच चालू करा डॉ रामेश्वर रावराणे

 

नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा

 

 

स्वस्त आयात तेलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते
सुमारे 30 वर्षांपूर्वी खाद्यतेलाचे भाव काय होते आणि सध्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवल्यास त्याचा थेट परिणाम तेलबियांच्या उत्पादनावर होणार आहे. भुईमूग व सोयाबीन उत्पादनांच्या स्थितीमुळे भविष्यात त्यांच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या दोन्ही तेलबियांचे घाऊक किमती कमी असल्याने आणि आयात केलेले तेल स्वस्त असल्याने ते एमएसपीपेक्षा कमी किमतीत विकले जातात आणि मिलर्स गाळप केल्यानंतर ते तेल वापरत नाहीत, त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.

“या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top